Udhav thackeray : मुंबई लोकल संदर्भात निर्णय लवकरच घेणार, मुख्यमंत्र्यांनी दिला अल्टीमेटम
कोरोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेने चांगलं काम केलं असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Udhav thackeray : कोरोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेने चांगलं काम केलं असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील झालेले नाहीत त्या जिल्ह्यांमधील व्यापाऱ्यांनी नियम मोडू नये आणि संयम सोडू नये असंही आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल आहे. सर्वांची अशी मागणी आहे, की सगळीकडेच शिथीलता द्यावी. मात्र ते शक्य नाही. जिथे निर्बंध शिथील होऊ शकतात तिथे तसा निर्णय घेण्यात आला आहे.पण काही ठिकाणी नाईलाज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचं उद्घघाटन केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मुंबईची लोकल ही सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याची. लाखो मुंबईकर लोकल सगळ्यांसाठी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सध्याच्या घडीला मुंबई लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे.
अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. मुंबईच्या आसपास असणाऱ्या शहरांमधील कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन जबाबदारीचं भान ठेवून लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या काळात वाईट स्थिती असताना मुंबई महापालिका लोकांच्या मागे उभी राहिली. कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळेच हे शक्य झालं आहे. आपल्या मुंबई मॉडेलचं कौतुक जगभरात अनेक दिग्गज व्यक्तींकडून करण्यात आलं. धारावीने कोरोनाला हरवलं ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. कोरोना संकटाचा सामना करत असतानाच मुंबईत विकासकामं देखील सुरू आहेत. जी पश्चिमचं कार्यालय दूरदृष्टी ठेवून केलं गेलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
Narendra Patil : चक्क देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले टॅटूने गोंदून…
Indigo airlines : इंडिगोकडून 15 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफर काय आहे,जाणून घ्या.