
BMC UPDATE : मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी एक गंभीर भविष्यवाणी केली आहे, की 2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा एक मोठा भाग, व्यापारी जिल्हा नरिमन पॉईंट आणि राज्य सचिवालय मंत्रालयासह, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली जाईल असे, ते म्हणाले.
This sea-level-rise projection for Mumbai is really scary. Shows most of greater Mumbai underwater, including the areas around two nuclear installations. Tens of millions displaced. All this by 2050. Never imagined it could happen in a few decades.
— Amitav Ghosh (@GhoshAmitav) October 29, 2019
महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी मुंबई हवामान कृती आराखडा आणि त्याच्या वेबसाइटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. तसेच चहल ही त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी शहराच्या दक्षिण मुंबईतील अ, ब, क आणि ड वॉर्डांपैकी 70% वार्ड जलवायु हवामानामुळे पाण्याखाली जाऊ शकतात असा दावा केला आहे.
Thanks to global warming, Mumbai could be submerged by 2050!
Although we are running out of time, it’s never too late for us to spotlight real issues that matter & innovation solutions that deliverhttps://t.co/sM97rN4wPB pic.twitter.com/HYbHFR6Ikv
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) October 30, 2019
त्यांचे असे म्हणणे आहे की निसर्ग चेतावणी देत आहे, परंतु जर लोक “जागे” झाले नाहीत, तर परिस्थिती “धोकादायक” ठरेल. ते म्हणाले, “कफ परेड, नरिमन पॉइंट आणि मंत्रालय पाण्यामध्ये बुडून जातील, म्हणजे ते नाहीसे होणार आहेत.” हा केवळ 25-30 वर्षांचा कालावधी आहे कारण 2050 जास्त लांब नाही असे बोलून इकबाल सिंह चहल यांनी सर्वांना सावध केले आहे.
“आपल्याला निसर्गाकडून इशारे मिळत आहेत आणि जर आपण जागे झालो नाहीत तर पुढील 25 वर्षात धोकादायक परिस्थिती निर्माण होईल आणि याचा परिणाम फक्त पुढच्या पिढीवरच नाही तर सध्याच्या पिढीवरही होऊ शकतो. मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे जे आपल्या हवामान कृती आराखड्याची तयारी आणि काम करत आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
Rising sea may put 36 million Indians at risk by 2050
Mumbai, Kolkata, Chennai, Kochi, Surat and the entire Odisha coast may be at risk from flooding and inundation due to sea level rise by 2050, according to a new study
READ: https://t.co/SfqZlhbvHh pic.twitter.com/wRNJ00aZhw
— The Times Of India (@timesofindia) October 31, 2019
अलीकडेच शहराला काही अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यावरच बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हवामान कृती आराखडा अंतर्गत तसेच डेटा मूल्यमापनाने वाढत्या हवामानातील अनिश्चिततेमुळे मुंबई हे सर्वात असुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले आहेत.